परळी-बीड-नगर-पुणे रेल्वे सेवा सुरु करावी -भगवान फुलसौंदर

 


शिवसेनेच्यावतीने स्टेशन प्रबंधकांना निवेदन

नगर -  परळी-बीड-नगरपुणे रेल्वे सेवा सुरु करण्यात यावीया मागणीचे निवेदन शहर शिवसेनेच्यावतीने माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर यांना निवेदन देण्यात आलेयाप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगेमाजी महापौर अभिषेक कळमकरनगरसेवक बाळासाहेब बोराटेयुवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोडदत्ता जाधवदत्ता कावरेयोगीराज गाडेगिरिष जाधवअमोल येवलेप्रशांत गायकवाडकाका शेळकेसंग्राम कोतकरदिपक खैरेपरेश लोखंडेजालिंदर वाघ,  सुरेश क्षीरसागरअशोक दहिफळेसुरेश तिवारीगौरव ढोणे,  पप्पू भालेप्रमोद ठुबेआंबादास शिंदेअरुण झेंडेअरुणा गोयल  आदि उपस्थित होते.

     स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कीरेल्वे मंत्रालय लवकरच आष्टी-नगर अशी रेल्वे सुरु करणार असल्याचे समजतेवास्तविक ब्रिटीश काळापासून बीड जिल्हा रेल्वे सेवेपासून वंचितच राहिलाअखेर त्या जनतेला आपण न्याय आणि समाधान देण्यासाठी विकासाचे पाऊल उचलले आहेत्याबद्दल आपले अभिनंदनपण ही रेल्वे परळी-बीड-नगर-पुणे अशी सुरु व्हायला हवी तरच बीडकर आणि नगरकरांचे भले होणार आहेमराठवाडा  नगरमधील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठीनोकरीसाठी पुणे या ठिकाणी जात असल्यामुळे त्यांच्या  भवितव्यासाठी परळी-पुणे रेल्वे सेवा सुरु करणे गरजेचे आहे.

     नगर आणि बीड जिल्ह्यात वाढते औद्योगिकरण  झाल्याने आणि साखर सम्राटांचे जिल्हे म्हणून नावारुपास आल्याने या जिल्ह्यात तरुणांना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला नाहीतसेच उच्च शिक्षणाच्या सुविधा म्हणाव्या अशा झाल्या नाहीतत्यामुळे या जिल्ह्यातील तरुण वर्ग नोकरी व्यवसायानिमित्त पुणे आणि मुंबईकडे धावलात्यामुळे या दोन शहराची नगर आणि बीडचे जवळकीचे नाते निर्माण झाले आहेनगरपासून पुणे अवघे 120 किमी आणि आरि परळी ते पुणे अंतर 338 कि.मीआहेसध्या एस.टी.महामंडळाचा संप सुरु असल्याने खाजगी वाहनातून प्रवासाला दुप्पट खर्च करावाला लागत आहे.

     आपल्या रेल्वे मंत्रालयाने मागील 3 वर्षापूर्वीच नगर-पुणे लोह मार्गाचे अंतर आणि वेळ कमी करण्यासाठी दौंड मार्गावर अलीकडे केडगाव पर्यंत कॉड लाईन टाकून या रस्त्यावरुन प्रवासी आणि मालगाड्यांची वाहतुक सुरु देखील केलीपण नगर-पुणे शटल रेल्वे सुरु केली नाहीआता दोनच महिन्यापूर्वी आपण नगर-आष्टी रेल्व मार्गाचे काम पूर्ण केले आणि आता आपण या मार्गावरुन रेल्वे देखील सुरु करीत आहोतपण ही रेल्वे परळी-बीड-नगर-पुणे अशी केल्यास त्याचा लाभ बीडकरांसह नगरकरांना देखील होईल  वाजवी दरात लोक प्रवास करु शकतीलनगर आणि बीडच्या विकासाला आणि प्रगतीला चालना देण्यासाठी ही रेल्वे सुरु होणे आवश्यक आहे तरी या मागणीचा सकारात्मक विचार व्हावा.

     ही रेल्वे सुरु  केल्यास शिवसेनेला रेल रोको आंदोलन करण्याचा मार्ग अवलंबावा लागेलतरी आपण योग्य ती सकारात्मक कार्यवाही करावीअसेही निवेदनात म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post