नगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील सर्व घटकांसाठी विविध लाभदायी योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा लाभ अनेकांना मिळत आहे. असंघटीत क्षेत्रात काम करणार्यांच्या श्रमाला मोल मिळावे या उद्देशाने सुरु केलेल्या ‘ई-श्रमिक’ योजनेमुळे अनेक छोटया-मोठ्या कारागिर, कामगारांना लाभ होत आहे. या योजनेच्या लाभार्थींना सुरक्षा साहित्य, विमा कवच, त्याचबरोबर त्यांच्या आवश्यक गरजा पुर्ण करण्यात येणार आहे. तेव्हा या योजनेचा लाभ संबंधितांनी घेणे आवश्यक आहे. या योजनेची माहिती गरजूंपर्यंत पोहचविण्याचे काम भाजपाच्या कार्यकर्त्यांनी करावे. सर्वसामान्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी भाजप युवा वॉरिअर्स घेत असलेला पुढाकार हा कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केले.
भाजपा युवा वॉरिअर्सच्यावतीने प्रभाग क्र.15, स्टेशन रोड परिसरातील आदर्श गौतमनगर, रोहिदास वाडी येथे केंद्र सरकारच्या ई-श्रमिक कार्डची नोंदणी व वितरण भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संघटन सरचिटणीस अॅड.विवेक नाईक, कॅन्टो.उपाध्यक्ष वसंत राठोड, युवा वॉरिअर्सचे शहर जिल्हाध्यक्ष विशाल खैरे, केडगांव मंडल अध्यक्ष पंकज जहागिरदार, भाजपा कामगार आघाडी शहर जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, युवा वॉरिअर्स उपाध्यक्ष राहुल तांबे, केंद्र प्रमुख विजय घासे, किशोर कटोरे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी विशाल खैरे म्हणाले, भाजप युवा वॉरिअर्सच्यावतीने समाजातातील तळागाळातील लोकांना त्यांचे हक्क, अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्ते करत आहे. स्टेशन रोड परिसरात अनेक कामगार, कारागिर राहत असल्याचे त्यांच्यासाठीच्या केंद्रीय ई-श्रमिक योजनांची माहिती देऊन त्यांचा या योजनेत समावेश करुन घेतला आहे. यापुढील काळातही असेच काम युवा वॉरिअर्सच्यवतीने सुरु राहील, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय घासे यांनी केले तर आभार किशोर कटोरे यांनी मानले. यावेळी हिरा पाडळे, गणेश जाधव, भागवत कुरधने, सचिन माने, गणेश जाधव, सागर सपकाळ, राजू परदेशी, बाबूलाल शिंगरे, संतोष शेळके, रोहित घासे, अशोक घेवरे, विशाल डोंगरे, आकाश करवरे, बाबा साळवे, काळूराम खुडे, महेश शेळके आदि उपस्थित होते.
Post a Comment