रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३१ टक्के
अहमदनगर: रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २५७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ३०० झाली आहे.
प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर ४९,मनपा १६ अकोले १५, जामखेड ०३, कर्जत ११, कोपरगाव १२ नगर ग्रा. ०९ नेवासा ०८, पारनेर ३७, पाथर्डी ०३, राहता ३२ राहुरी २२ शेवगाव ०६, श्रीगोंदा २२श्रीरामपूर ०५ आणि इतर जिल्हा ००अशा एकूण २५८ रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:३,४१,७५१
उपचार सुरू असलेले रूग्ण:३०००
पोर्टलवरील मृत्यू नोंद:६९६०
एकूण रूग्ण संख्या:३,५१,१८९
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*
Post a Comment