अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा. - पांडुरंग माने

 


अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा. - पांडुरंग माने


अहमदनगर (प्रतिनिधीराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आहेत. कुशल प्रशासक व आदर्श न्याय पद्धतीच्या जोरावर त्यांनी रयतेच्या जगण्याचा खऱ्या अर्थाने राम आणला.  हिंदुस्तान परकिय राजवटीमुळे शंत खंडित झाला होता. त्यास अखंडित ठेवण्याचा काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. या खंडप्राय देशाच्या प्रत्येक भौगोलिक स्थानावर त्यांनी अनेक मंदिरांची निर्मिती केली व शेकडो मंदिरे जनार्धन  जीनौद्रधार केला व हिंदू संस्कृतीला पुनर्जीवित करत भारत भूमीला आत्मसन्मान मिळवून दिला. अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करावी अशी मागणी प्रा. राम शिंदे युवा मंच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. पांडुरंग माने यांनी केली आहे. अशा या महान प्रेरणादायी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेर जन्मस्थान अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड ता. चौंडी हे आहे.

महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण हिंदुस्थानला नवी दिशा दिली. देशाला अखंडित ठेवले. त्यांच्या महान स्मृती पुढे नतमस्तक होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असे करण्यात यावे..  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  व अहिल्यानगर चे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे साहेब,तथा विद्यमान पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांना ईमेलद्वारे मागणी करण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post