शेतकरी-कामगार विरोधी कायदा रद्द करण्यासाठी
काँग्रेसची नगरमध्ये सह्यांची मोहिम
नगर - केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी व कामगार विरोधी कायद्यास विरोध करण्यासाठी येथील मार्केट यार्ड, बाजार समिती आवारात अ.नगर शहर व भिंगार काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने सह्यांची मोहिम सुरु करण्यात आली. या मोहिमेत नगर शहरातून 10 हजार सह्यांचे उदिष्ट्ये निश्चित करण्यात आले आहे. या मोहिमेत कार्यकर्त्यांसमवेत शेतकर्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत केंद्र सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.
प्रारंभी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख यांनी या आंदोलनाची पार्श्वभुमी स्पष्ट केली. शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यावेळी म्हणाले, भाजप प्रणित केंद्र सरकारचा हा नवा कायदा शेतकरी व कामगार विरोधी असून, या कायद्यामुळे बाजार समितीचे आस्तित्व नष्ट होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांची हक्काची बाजारपेठ राहणार नाही. तर भिंगार अध्यक्ष अॅड.आर.आर.पिल्ले यावेळी म्हणाले, कार्पोरेट कंपनीला मोठा नफा मिळवून देणार्या या कायद्याने शेतकर्यांना मात्र कमी भावात माल विकावा लागला तर ग्राहकांना जादा दराने शेतीमाल खरेदी करावा लागेल. एकाचवेळी शेतकरी आणि ग्राहकांना मोठा आर्थिक फाटका बसून कार्पोरेट कंपनीच्या घशात मोठी रक्कम मिळणार आहे.
पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज खान यावेळी म्हणाले, या कायद्यामुळे देशातील शेतकरी आणि कामगार देशोधडीला लागणार आहेत आता तरी डोळे उघडा. अन्यथा भाजपप्रणित केंद्र सरकार हुकुमशाही लादत देशातील जनतेला गुलाम बनवत आहे.
या मोहिमेत प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, पक्षाचे शहर उपाध्यक्ष व माजी पोलिस उपनिरिक्षक एम.आय.शेख, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, सुभाष रणदिवे, प्रदेश सदस्या श्रीमती शारदा वाघमारे, रजनी ताठे, सौ.मीना धाडगे, सौ.किरण आळकुटे, महेश घोरपडे, संतोष कांबळे, जरीना पठाण, अॅड.नरेंद्र भिंगारदिवे, अन्वर शेख, निजाम पठाण, संजय झोडगे, विजय आहेर, राजेश बुंदेले, बबन सावंत, योगेश कवेकर, परमेश्वर पठाण, प्रकाश साळवे,अर्जुन गायकवाड, आनंद आव्हाड, रवी सूर्यवंशी, डि.जी.भांबळ आदि सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परवेश झकेरिया व फजलसर यांनी केले तर शहर सरचिटणीस अभिजित कांबळे यांनी आभार मानले
Post a Comment